तथापि, हा स्त्री-विरोधी पूर्वाग्रह आता फक्त गरीब कुटुंबांपर्यंतच सीमित नाही. बहुतेक भेदभाव सांस्कृतिक मान्यता आणि सामाजिक मानदंडांमुळे बळावतो. ह्या कुप्रथा बंद करण्यासाठी स्वत:लाच आव्हान द्यावे लागणार आहे. भारतातील स्त्री-नापसंतीच्या प्रथेसाठी सामाजिक-आर्थिक कारणांना जबाबदार ठरविले जाऊ शकते. भारतातील अध्ययनात भारतामधील स्त्री-नापसंतीचे तीन कारक संकेत मिळाले आहेत, ज्यामध्ये आर्थिक उपयोगिता, सामाजिक-सांस्कृतिक उपयोगिता आणि धार्मिक समारंभांचा समावेश आहे.
- आर्थिक उपयोगितेचा घटक म्हणून अध्ययनांनी दर्शविले आहे की मुलीपेक्षा मुलगा हा घरच्या शेतीची देखभाल, कुटुंबाचे भरण-पोषण, वृध्दापकाळी आई-वडिलांचा सांभाळ करतो.
- लग्न झाल्यावर, मुलगा कुटुंबाची संपत्ति म्हणून एक सून आणतो जी घरकामांत मदत करते आणि हुंड्याच्या स्वरूपात आर्थिक संपन्नतादेखील आणते, तर मुली लग्न झाल्यानंतर निघून जातात आणि हुंड्याच्या स्वरूपात एक आर्थिक दंड उकळतात.
- स्त्री-नापसंतीचा सामाजिक-आर्थिक घटक असा की, चीनप्रमाणेच, भारतातील कुटुंबांत पितृसत्ताक व्यवस्थेनुसार कौटुंबिक रेषेच्या निरंतरतेसाठी कमीत कमी एक पुत्र असणे आवश्यक आहे आणि पुत्र कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवितात.
- स्त्री-नापसंतीचा अंतिम घटक म्हणजे काही धार्मिक कार्ये फक्त मुलेच करू शकतात, हिंदू संस्कृतिप्रमाणे, जो जनादेश पाळतो आणि त्यांच्या स्वर्गीय आई-वडिलांच्या चितेस अग्नि देऊन त्यांच्या आत्म्यास मोक्ष मिळवून देण्यात मदत करतात.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा